Sakshi Sunil Jadhav
वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही झटपट एक मस्त खमंग आमटी तयार करू शकता. ती आमटी भाकरी किंवा चपातीसोबत सुद्धा खाता येते.
तयार कांदा भजी, कांदा, टोमॅटो, लसूण, अदरकचा तुकडा, कोथिंबीर, शेंगदाणे कुट, हळद, तिखट, धनेपावडर, जिरापावडर, हिंग, खोबरं किसलेलं, गरम मसाला, मीठ, तेल इ.
सर्वप्रथम भजी तयार करून घ्या. कांदा, टोमॅटो, खोबऱ्याचा कीस, शेंगदाणा, हिरवी मिरची मिक्सरमधून भिरवून पेस्ट तयार करून घ्या.
आता कढईत तेल घालून घ्या. तेल गरम झालं की, त्यात मोहरी घाला.
मोहरी तडतडल्या नंतर त्यात तयार केलेला मसाला, आलं-लसूण पेस्ट घालून दोन मिनिटं परतून घ्या.
आता त्यात तिखट धने पावडर, जीरे पावडर, हळद, हिंग घाला. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्या. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घाला.
पुढे मीठ, गरम मसाला घालून चांगले मिक्स करून उकळी येऊ द्यावी. गॅस स्लोवरच ठेवा. मग शेवटी कोथिंबीर घालून भज्याची आमटी सर्व्ह करा.